एकेदिवशी देखील असच झालं. पिहू आणि
तिचे जादूई मित्र हे पुस्तक मी मुलांना वाचून दाखवत होते. पुस्तकातली पिहुची जादूई
पेटी, त्यात असलेल्या रंगीबेरंगी पेन्सिली, खोडरबर आणि त्यांची जादू हे ऐकून मुलं दंगून गेली. आपलं पुरात वाहून
जाणार गाव पाहून पिहुला वाईट वाटतं आणि या जादूई मित्रांच्या मदतीने ती गाव पुन्हा
नव्या सारख करते. म्हणजे ती जे चित्र काढेल ते प्रत्यक्ष तसंच घडतं, ती जे खोडेल ते कायमच मिटून जात. त्यामुळे
पाऊस, काळे ढग, पुरामुळे झालेलं नुकसान ती खोडरबर ने
नष्ट करते आणि पेन्सीली च्या मदतीने जे जे हवं ते ते नवीन निर्माण करते.
आता गोष्ट वाचून झाल्यावर गप्पा करत
असतांना मी मुलांना विचारलं, ‘तुम्हाला
जर अशी जादूची पेटी मिळाली तर तुम्ही काय निर्माण कराल?
एक एक करून मुलं सांगू लागली. हर्षा
म्हणाला, ‘आपल्या बालनगरी
मध्ये सर्वाना बसायला पुरेशी जागा नाही, लहान
मुलांना सारखं बाहेर,
उघड्यावर, उन्हा तान्हात बसावं लागतं. त्यांच्यासाठी मी एक खोली (रूम) तयार करेन. दीपक म्हणाला, ‘मी आपल्या बालनगरीला
रंग देवून नव्या सारखं बनवेल’. अंजना
म्हणाली, ‘बालनगरी मध्ये लाईट, फॅन
ची सोय नाही. मी लाईट फॅन काढेल.
वैष्णवी म्हणाली. ताई-दादा तुम्ही आमच्यासोबत
जमिनीवर बसता. आमच्या
शाळेत गुरुजींना टेबल खुर्ची असते. मी तुमच्यासाठी सर्व पोरांसाठी बसायला टेबल
खुर्ची तयार करेन.
सोपान म्हणाला, ‘आपले साहित्य आणि
खेळणी ठेवायला मी कपाट बनवेन. तर
सोनू म्हणाली, ‘मी मोठा फळा तयार करेन’.
अशा प्रमाणे एकेक करून मुलांनी आपआपली
मते मांडली. कुणी म्हणाले, आपलं गाव सुद्धा नव्या सारख करू. पाणी,लाईट, रस्ते, घर, सगळं छान तयार
करू आणि त्यापेक्षा जास्त बालनगरी मध्ये मोठी इमारत, सर्वांना राहण्यासाठी होस्टेल
आणि खेळायला ग्राउंड (मैदान) करू.
मुलांची उत्तरे ऐकून मी खूप भारावून गेले.
मुलं किती बारकाईने आपल्या आजूबाजूच्या परिस्थिती कडे बघतात, आपल्या सोबतच्या लहान गटातल्या मुलाबद्दल त्यांना वाटणारी काळजी. आपण
शिकत असलेल्या परिस्थितीची जाणीव. आपल्या सामुदायिक गरजा. भविष्यवेधी असलेली
दृष्टी. आम्हाला प्रश्न पडला कि, कुणी सांगितलं असेल या चिमुकल्यांना ह्या गोष्ठी.
आम्ही तर यावर कधी बोललो सुद्धा नाही. मिळेल त्या परिस्थितीमध्ये आम्ही मुलांना
फक्त शिकवत गेलो. मुल केवळ स्वत: चा विचार न करता. करत असलेला सर्वसमावेशक विचार
आणि त्यांचा संवेदनशील दृष्टिकोन मला खूप
ऊर्जा देऊन गेला.
गोष्टी वाचनाने मुलांचा भाषिक विकास
होतो. मुल विचारशील, संवेदनशील, चिकित्सक विचार करायला लागतात. त्यासोबतच मुलाचं भावविश्व समृध्द होत जातं.
नवीन पुस्तक नवीन विचार दरवेळी आम्हाला असाच एक नवा अनुभव देवून जातो.
#balnagari #oveetrust.org
पालकनीती मासिकात प्रसिद्ध झालेला लेख त्याची ही लिंक
https://palakneeti.wordpress.com/2022/05/28/%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%b2%e0%a5%80%e0%a4%95%e0%a4%a1%e0%a5%87/#more-3574
No comments:
Post a Comment